गाजर गवतापासून कंपोस्ट खतनिर्मिती

गाजर गवतापासून कंपोस्ट खतनिर्मिती

(Download Agrojay Mobile Application :- http://bit.ly/Agrojay)

महाराष्ट्रात हे गवत फक्त शेतकर्‍यांसाठीच नाहीतर मनुष्यप्राणी , पर्यावरण तसेच जैवविविधतेसाठी एक मोठा धोकाच बनत चाला आहे. यासाठी गाजर गवतापासून कंपोस्ट खत कसे तयार करावे त्याचे फायदे व पर्यावरणाची सुरक्षा कशी राखावू या संबंधीची माहिती सदरच्या लेखात दिली आहे.

भारतात गाजर गवत प्रथम 1950 मध्ये आढळून आले. कारण 1950 मध्ये भारतात भीषण दुष्काळ पडला होता व त्यासाठी भारताने अमेरिकेतून गहू आयात केला होता व त्यामधून गाजर गवताचा प्रसार भारतात झाला.

गाजर गवतास कांग्रेस गवत, चटक चांदणी, कडू गवत अशा अनेक नावांनी ओळखले जाते. आज भारतामध्ये हे गवत फक्त शेतकर्‍यासाठीच नाहीतर मनुष्य प्राणी, पर्यावरण तसेच जैवविविधतेसाठी एक मोठा धोका बनत चालले आहे. गाजर गवताचे शास्त्रीय नाव पार्थेनियम हिस्टेरोफोरस हे आहे. गाजर गवतास आधी फक्त पीडित क्षेत्रातील समस्या मानली जायची, पण आता ते प्रत्येक प्रकारच्या पिकामध्ये, उद्याने, वनांमधील एक भीषण समस्या बनली आहे.
 
  • गाजर गवतापासून कंपोस्ट खत बनवा, सोबत दोन लाभ मिळवा : 
 सधन कृषिप्रणालीमध्ये रासायनिक खतांचा अत्याधिक वापर केल्यामुळे मानवी स्वास्थ्य व पर्यावरणावर होणार्‍या घातक परिणामांची कल्पना आपण सर्वांनाच आहे. तसेच जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे रासायनिक खताद्वारे मानव व पर्यावरणावर होणार्‍या दुष्परिणांमुळे जैविक खतांचे महत्त्व वाढत आहे. गाजर गवतापासून जैविक खत बनवून पर्यावरणाची सुरक्षा तसेच पैसेसुद्धा मिळवू शकतो. खुरपणी करून आपण शेतातून गाजर गवत व अन्य तण काढून टाकून पिकांचे संरक्षण करतो व काढलेल्या तणांपासून शास्त्रीय पद्धतीने जैविक खते तयार करून पीक उत्पादनसुद्धा वाढवले जाऊ शकते.
  • गाजर गवतापासून कंपोस्ट खत बनविण्यास शेतकर्‍यांना भीती का वाटते : 
एका सर्वेक्षणामध्ये असे लक्षात आले आहे, की शेतकरी गाजर गवतापासून कंपोस्ट खत बनवण्यास या कारणामुळे भीतात की, गाजर गवतापासून बनविलेले कंपोस्ट जर शेतात वापरले, तर शेतात जास्त गाजर गवत होईल. काही शेतकर्‍यांनी शास्त्रीय पद्धतीने कंपोस्ट न बनविल्यामुळे ही स्थिती उत्पन्न झाली आहे. तसे सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले की, जेव्हा काही शेतकर्‍यांनी फुले आलेल्या गाजर गवतापासून नाडेप पद्धतीने कंपोस्ट बनवून उपयोग केला तर गाजर गवत झाले, तसेच शेणखताच्या टाक्यामध्ये किंवा खड्ड्यामध्येसुद्धा बनवले जाते. जर फुले आलेल्या गाजर गवतास जर खड्ड्यामध्ये शेणखतासोबत टाकल्यास व ते खत शेतामध्ये टाकल्यास गाजर गवताचा अधिक प्रकोप दिसून आला आहे. छंजपवदंस त्मेमंतबी ब्मदजमत वित ॅममक ैबपमदबम ने केलेल्या संशोधनानुसार नाडेप, खड्डे व टाक्यामध्ये फूल आलेल्या गाजर गवतापासून कंपोस्ट बनवल्यास त्यांचे अतिसूक्ष्म बियाणे नष्ट होत नाहीत. एका अभ्यासामध्ये असे दिसून आले की, नाडेप पद्धतीने बनविलेल्या केवळ 300 ग्रॅम कंपोस्टमध्ये गाजर गवताचे 500 रोपे अंकुरित झालेले दिसून आले आहेत.

वरील सर्व कारणांमुळे शेतकरी गाजर गवतापासून कंपोस्ट बनवण्यास भीतात, पण जर शास्त्रीय पद्धतीने कंपोस्ट बनवल्यास ते एक सुरक्षित व उपयुक्त कंपोस्ट खत आहे.

  •  गाजर गवतापासून कंपोस्ट बनविण्याची पद्धत :
गाजर गवताच्या बियांमध्ये थंडी-गरमीच्या दिवसांत सुप्तावस्था नसल्यामुळे एकाच वेळेस फुले असलेली व फुले नसलेले गाजर गवत आढळून येेते. त्यामुळे फुलयुक्त व फुले नसलेली दोन्ही झाडे उखडणे अपरिहार्य होऊन जाते. तरीही शेतकर्‍यांनी गाजर गवतापासून कंपोस्ट बनवण्यास दर संभव प्रयत्न केला पाहिजे. कंपोस्ट बनवण्यासाठी गाजर गवतास अशा वेळी उपटणे गरजेचे आहे की ज्या वेळी फुलांची मात्रा कमी असेल. त्यामुळे जितक्या लहान अवस्थेमध्ये गाजर गवताचा उपयोग कंपोस्ट बनविण्यासाठी होईल तितके चांगले कंपोस्ट बनेल आणि तेवढीच जास्त पिकाची उत्पादकता वाढेल.

  • खाली दिलेल्या पद्धतीप्रमाणे गाजर गवतापासून कंपोस्ट बनवले जाऊ शकते. :

1) कंपोस्टचा खड्डा बनविण्यासाठी शेतामध्ये थोडी उंचावरील जागा निवडावी, जेणेकरून तेथे पाणी साचणार नाही.
2) खड्ड्याचा आकार 3 ग 6 ग 10 (खोली ग रूंदी ग लांबी) असावा. तसेच आवश्यकतेनुसार खड्ड्याची लांबी व रुंदी कमी करू शकतो, पण त्याची खोली 3 फुटांपेक्षा कमी नसावी.
3) खड्ड्याच्या आतील बाजूस ठोकून कडक करून घ्यावे. कारण खड्ड्याचा आतील भाग समतल व पक्का असणे गरजेचे आहे. त्यामुळे कंपोस्टमधील पोषक तत्त्वे जमिनीने शोषण घेऊ नयेत.
4) आपल्या शेतामधील, तसेच आसपासचे गाजर गवत मुळासकट उपटून खड्ड्याच्या जवळ एकत्र करावे.
5) खड्ड्याच्या जवळ 75-100 कि.ग्रॅम ओले शेण, 5-10 कि.ग्रॅम युरिया किंवा रॉक फॉस्फेट, चांगली चाळलेली 1-2 क्विंटल माती आणि एक पाण्याची टाकी इ. व्यवस्था करून घ्यावी.
6) नंतर 50 कि.ग्रॅ. गाजर गवताचा थर खड्ड्यामध्ये द्यावे व त्यावर 5 ते 7 कि.ग्रॅ.शेण 20 लीटर पाण्यामध्ये मिसळून गाजर गवताच्या थरावर समप्रमाणात शिंपडावे.
7) त्यावर 500 ग्रॅ. युरिया किंवा 3 कि.ग्रॅ रॉक फॉस्फेटचा शिडकावा करावा. जर कंपोस्ट खताचा वापर सेंद्रिय शेतीसाठी करायचा असेल तर युरियाचा वापर करू नये.
तसेच प्रतिथर 10 ते 12 कि.ग्रॅ. माती टाकावी.
8) उपलब्ध असल्यास ट्रायकोडरमा विरीडी किंवा ट्राईकोडरमा हारजनिया या बुरशीनाशकाचा वापर 50 ग्रॅ. प्रतिथर याप्रमाणे करावा. या बुरशीनाशकाचा वापर केल्यास गाजर गवताच्या मोठ्या झाडांचे अपदान जलद व कंपोस्ट बनण्याची प्रक्रिया जलद होते व कंपोस्ट खतांची प्रत सुधारते. पण याचा वापर उपलब्धतेवर अवलंबून आहे.
9) अशाप्रकारे सर्व बाबींचा मिळून पहिला थर द्यावा.
10) याप्रमाणे एकावर एक असे थर देत जावे की, जोपर्यंत थरांची जाडी खड्ड्यापासून एक फूट वर येत नाही तोपर्यंत खड्डा चांगला दाबून व पायांनी तुडवून भरावा.
11) खड्ड्याचा वरचा थर असा दाबावा की त्याचा आकार डोमसारखा झाला पाहिजे.
12) गाजर गवतास मुळासकट उखडण्यामागील कारण म्हणजे मुळांना लागून येणार्‍या मातीचा उपयोग कंपोस्ट बनविण्याठी व्हावा, पण जर आपल्याला वाटले की, मुळांना लागून आलेली माती कमी आहे. तर प्रतिथर 10 ते 12 कि.ग्रॅ. माती टाकावी.
13) शेण, माती व भ्ाुसा यांचे मिश्रण तयार करून खड्ड्याचे तोंड चांगल्या प्रकारे बंद करावे.
14) गाजर गवतापासून चांगल्या प्रतीचे कंपोस्ट बनण्यास साधारणत: 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागतो.
15) वरील खड्ड्यामध्ये भरण्यासाठी 37 ते 42 क्विंटल गाजर गवत लागेल व त्यापासून 37 ते 45 टक्के कंपोस्ट प्राप्त होते.

  • कंपोस्ट खताची चाळण : 
5 ते 6 महिन्यांनंतर गाजर गवतापासून कंपोस्ट खत तयार होते. नंतर खड्ड्याबाहेर काढल्यानंतर असे प्रतीत होऊ शकले की, मोठे गाजर गवत चांगल्या प्रकारे कुजलेले नसते. कंपोस्ट खड्ड्याबाहेर काढल्यानंतर प्रथम सावलीत सुकवून घ्यावे. सुकवल्यानंतर गाजर गवत जाड मिळाले तर काडीने ठोकून बैल किंवा ट्रॅक्टर असल्यास फिरवून घेऊन बारीक करावे. त्यामुळे मोठे तण बारीक होऊन अधिक कंपोस्ट प्राप्त होते. नंतर कंपोस्ट 2-2 सेंमीच्या चाळणीने चाळून घ्यावे. चाळल्यानंतर जाळीवर उरलेल्या जाड कचरा बाजूला करावा. नंतर खड्डा भरण्यासाठी पुन्हा वापरावा. नंतर कंपोस्ट सावलीत सुकवून प्लॅस्टिक किंवा अन्य बॅगेमध्ये भरावे. एखाद्या व्यक्ती किंवा शेतकर्‍याला गाजर गवतापासून कंपोस्ट बनवण्याचा व्यवसाय करायचा असल्यास परसबागेसाठी उपयोगात येईल अशा 1,2,3, 5 किलोची पाकिटे तसेच व्यवसायाच्या द़ृष्टीने लहान मोठी पाकिटे बनवू शकतो.
  • गाजर गवतापासून बनवलेल्या कंपोस्टमधील अन्नद्रव्यांचे प्रमाण :
तुलनात्मक अभ्यासानंतर असे लक्षात आले की गाजर गवतापासून बनवलेल्या कंपोस्टमध्ये मुख्य अन्नद्रव्यांचे प्रमाण शेणखतांच्या दुप्पट व गांडुळ खताच्या समप्रमाणात असेल त्यामुळे गांडुळखतापासून कंपोस्ट बनवणे हा एक चांगला पर्याय आहे.


            अन्नद्रव्यांचे प्रमाण (टक्के)
 
 सेंद्रिय खतांचे प्रकार     छ     च्     ज्ञ     ब्ं     डह
 गाजर गवतापासून बनवलेले कंपोस्ट खत
 1.05     0.84     1.11     0.90     0.55
 गांडुळखत     1.61     0.68     1.31  0.65   0.43
 शेणखत     0.30     0.54     0.30     0.59     0.25

  • गाजर गवतापासून कंपोस्ट बनवताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी. : 

1. कंपोस्टसाठी खड्डा बनवताना सावलीत, उंच जागेवर, मोकळ्या हवेत व पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी बनवावा.
2. गाजर गवतास कोणत्याही परिस्थितीमध्ये फुले येण्याच्या आधी उपटावे. त्यामुळे गाजर गवतापासून अधिक चांगले कंपोस्ट बनते.
3.कंपोस्ट खड्डा भरल्यानंतर माती, शेण, भ्ाुसा याच्या निमित्ताने चांगल्या प्रकारे बंद करावा. कारण त्यामध्ये हवा जाऊन वरील थरामधील गाजर गवताचे बीज मरणार नाही.
4. आवश्यकतेनुसार एका महिन्याच्या अंतराने पाण्याचा शिडकावा करावा. पाणी टाकण्यासाठी केलेली छिद्रे पुन्हा व्यवस्थित बंद करावीत.

  • गाजर गवतापासून बनविलेल्या कंपोस्टपासून होणारे फायदे :
1) गाजर गवतापासून बनविलेले कंपोस्ट खत हे असे सेंद्रिय खत आहे की, त्याच्या उपयोगाने पिके, मनुष्य व प्राणी यांच्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही.
2) कंपोस्ट बनवल्यानंतर गाजर गवतामध्ये आढळणारे विषारी रसायन पार्थेकिनचे पूर्ण पणे विघटन होते.
3) गाजर गवतापासून बनविलेले कंपोस्ट एक संतुलित खत असून त्यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश यांचे प्रमाण शेणखतापेक्षा जास्त असते. त्याव्यतिरिक्त त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाणसुद्धा जास्त असते.
4) सेंद्रिय खत असल्याने याला पर्यावरणमित्र म्हणूनसुद्धा संबोधले जाते.
5) गाजर गवतापासून बनविलेले कंपोस्ट कमी मात्रेमध्ये जमिनीची सुपीकता वाढवते.
6) गाजर गवतापासून सेंद्रिय खत बनविण्यासाठी शेतकरी शेतातील गाजर गवत काढून एक प्रकारे आपल्या पिकांची उत्पादकता वाढवतो व बनविलेले कंपोस्ट शेतात वापरून जमिनीची सुपीकता तसेच विकून पैसेसुद्धा मिळवू शकतो. त्यामुळे फायदाच फायदा होतो.

  • वापरायचे प्रमाण :
1) जमिनीची मशागत करतेवेळी 2.5 ते 3 टन हे.
2) भाजीपाला लागवडीदरम्यान 4 ते 5 टन/हे.
3) गाजर गवतापासून बनवलेल्या कंपोस्ट खतांचा उपयोग अन्य सेंद्रिय खताप्रमाणेच करावा.

श्री. सुनील साबळे, डॉ. उषा डोंगरवार, डॉ. प्रवीण खिरारी,
कृषिविज्ञान केंद्र, साकोली



(Download Agrojay Mobile Application :- http://bit.ly/Agrojay)




See Below for More Information https://www.digitalbaliraja.com

Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology